Thursday, March 27, 2014

मुंबईचा राखणदार – शिवडीचा किल्ला

मुंबई बेटावर वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, सेंट जॉर्ज फोर्ट, बॉम्बे फोर्ट असे एकूण अकरा किल्ले बांधण्यात आले आहेत. पैकी बॉम्बे,फोर्ट, माझगाव आणि डोंगरी हे किल्ले आज अस्तित्वात नाहीत. मात्र, मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणारे वरळी, सायन, धारावी, माहीम आणि वांद्र्याचा किल्ला आजही आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. एकेकाळी मुंबईची राखण करणारा शिवडीचा किल्लाही त्याला अपवाद नाही.

हार्बर लाइनवरचे शिवडी स्थानक. पश्चिमेला उतरलात की, सुक्या मासळीचा वास नाकात भरतो. शिवडीच्या पश्चिमेलाच तशी माणसांची वस्ती. पूर्वेकडचा भाग तसा ओसाडच म्हणावा लागेल. कारण माणसांची अगदीच तुरळक वस्ती आणि बाकी सगळं घासलेट बंदर म्हणूनच परिचित. याच ठिकाणी जानेवारी ते एप्रिल महिन्यात फ्लेमिंगो बघायला गर्दी होते. एरव्ही या परिसरात फारसं कोणी फिरकतच नसावं. दिवसाढवळ्याही या ठिकाणी माणसं तशी फारच कमी दिसतात. सुरुवातीची एक-दोन टपरीवजा दुकानं सोडली तर बाकी सगळा परिसर ओसाडच म्हणावा लागेल. असं जरी असलं तरी हा परिसर दुतर्फा झाडांचा. या रस्त्याच्या टोकाशी आलं की, समोरच दग्र्याचं नाव लिहिलेली हिरवी पाटी दिसते. त्या कमानीपासून पुढे लांब लांब पाय-या दिसतात. या पाय-या किल्ल्याच्या आहेत याची पुसटशी कल्पनाही कोणाला येणार नाही. या पाय-या चढून वर गेलं की, प्रथम नजरेत भरतो तो पांढरा, हिरा आणि गुलाबी रंगातला सैयद जलाल शाह सैयद मुराद शाह यांचा दर्गा दिसतो. दर्ग्याच्या बाजूला शिवडीच्या खाडीचा नयनरम्य परिसर नजरेत भरतो. पायऱ्या चढून आल्याचा शीण कुठल्या कुठे निघून जातो. या खाडीचं आणखी एक वैशिटय़ म्हणजे या खाडीतून समोरच चेंबुरचे अणुशक्तीनगरही दिसतं. या निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेऊन जरासे वळलात की. बाजूलाच असलेली तटबंदी आपलं लक्ष वेधून घेते. हाच तो शिवडीचा किल्ला.

या किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे. मध्यंतरी किल्ल्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. मुख्य रस्त्यापासून जरा लांब असल्याने गोंगाटाचा लवलेशही नाही. त्यात भक्कम तटबंदी त्यामुळे शिरकाव करताना मन जरा साशंक होतं. इतकंच काय इथे कोणाला काही झालं तरी कित्येक दिवस कोणाला कळणारच नाही. पण एकदा का किल्ल्यात शिरकाव केला की, आपण अवाक झाल्याशिवाय राहत नाही. मजबूत तटबंदीत असलेली मोकळी जागा, मध्येच असणा-या पाय-या यामुळे आसपासची मुलं येथे अभ्यास करायला येतात.

मुंबई बेटाच्या पूर्व किना-याचे रक्षण करण्यासाठी सेंट जॉर्ज, डोंगरी, माझगाव, शिवडी हे किल्ले बांधण्यात आले. बॉम्बे फोर्टवर होणारे थेट हल्ले या बालेकिल्ल्यांमुळे रोखता यावे, हा याचा मुख्य हेतू होता. शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. १५३४ च्या तहात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यावर या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६७२ मध्ये जंजि-याच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नवीन किल्ले बांधले आणि जुने किल्ले मजबूत केले. परळ बेटाच्या पूर्व किना-यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नूतनीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये केले. १६८९ मध्ये जंजि-याच्या सिद्धी याकूत खानने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात त्याने शिवडी, माहीम आणि माझगाव हे किल्ले जिंकले. त्यावेळी शिवडी किल्ल्यावर ५० शिपाई, एक सुभेदार आणि १० तोफा असल्याची नोंद ऐतिहासिक पुस्तकात सापडते. इंग्रजांनी देशांतर्गत शस्त्रूंचा बिमोड केल्यावर या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला जात होता. त्यानंतरच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोडाऊन म्हणून याचा उपयोग झाला. त्याआधी पनवेल, उरण, ठाणे घारापुरीचा डोंगर या परिसरात होणा-या व्यापारावर, जहाजांवर, लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे.

असा हा शिवडीचा किल्ला. इतर किल्ल्यांच्या तुलनेत या किल्ल्याची परिस्थिती तशी उत्तमच आहे, असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य नसलं तरी गर्दुल्ले, भिकारी यांचा विळखा पडला आहे. रात्रीच्या काळोखात या ठिकाणी गैरवर्तनही होत असल्याची माहिती किल्ल्याची देखभाल करणारे अब्दुल रहीम मुजावर यांनी दिली. गेली ४०० वर्षे मुजावर यांचं कुटुंब किल्ल्याच्या शेजारी असलेल्या दग्र्याची आणि किल्ल्याची देखभाल करत आहेत. ते म्हणतात, ‘आमच्या परीने जेवढं शक्य होतं तितकी देखभाल आम्ही करतो. पण प्रत्येकाला थोपवणं आम्हाला शक्य होत नाही.’

मुंबईच्या इतिहासात शिवडी किल्ल्याचे स्थान महत्त्वपूर्ण होते. सत्ता संपादनासाठी पूर्वी गडकिल्ल्यांचे महत्त्व होते. मात्र, आता सत्ता संपादनासाठी किल्ल्यांची गरज उरली नसल्यामुळे हा किल्लाही अडगळीत पडला आहे. मुंबईचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी या इतिहासाच्या साक्षीदाराचा उल्लेख करण्यावाचून गत्यंतर नसेल.

Tuesday, March 25, 2014

Marathas and Man O' Wars

Trafalgar, 1805.

The greatest Naval Battle ever fought, by the Greatest Admiral who ever lived. It is still studied by Naval academies around the world. 
This battle fought by British against French and Spanish is the epitome of Warfare under Sail.
The battle was fought by a type of Warship known as "Ship of the Line" or "Man o' War".

Although it is reasonable that Marathas did not build such large, lumbering, ill-maneuverable Man O' Wars during its formative years. Considering the shallow coastline of the Konkan coast and everything...

However, once the coast was firmly under their hand, they did not turn their attention to the high seas. And therein lies their failure.

For to rule the seas you need Man o' Wars.

Only one person had the sense to see this. Tulaji Angre. He had started building two 74 gun ships during 1753-54. This obviously gave nightmares to the British at Bombay. 

They desperately begged for reinforcements from their homeland. And the Royal Navy sent some ships to help them. However, the golden opportunity was given to them by the Peshwa. An opportunity to meddle in the affairs of the Maratha State.

Instead of capturing the entire fleet of Tulaji, and then dividing it between Peshwa and Company, the British burnt the entire fleet. Including the two 74s which were near completion.

None of the Maratha sea powers, Baroda Gaikwads at Billimora, Peshwa at Vasai and Vijaydurg, Angres at Kolaba, Karvir Chhatrapatis at Malwan or Sawants at Redi, either before or after Tulaji, attempted to build such large ships.

Friday, March 14, 2014

Humphrey Cooke takes possesion of Bombay, 1665.

Humphrey Cooke takes possesion of Bombay, 1665.

The first Governor sent from England to take over Bombay (Mumbai) from the Portuguese was Sir Abraham Shipman, whose expedition fared very badly for nearly three years. Most of the party died, including Shipman himself, but at last, in 1665, a small mud fort on the Island of Bombay was handed over to his secretary, Humphrey Cooke. The European dress of the period in India was that of the natives except as to breeches and boots.

Source : Hutchinson's story of the nations

Wednesday, March 12, 2014

Maratha Shipyards

The first ship building operations began at Kalyan, Bhiwandi, Pen and Panvel. All of these were river ports, many KMs away from the sea.
Excessive deforestation has led to silting up of these rivers. This map of 1946 shows the reduced state of these rivers. Only the river Ulhas of Kalyan is left navigable in a broad sense.

Thursday, March 6, 2014

Thane Fort - ठाण्याचा किल्ला

Thane Fort - ठाण्याचा किल्ला

किल्ल्याला दोन गोलाकार बुरुज आहेत, बाकी सगळे त्रिकोणी आहेत. उजवीकडील गोलाकार बुरुज म्हणजेच दर्या बुरुज. एकेकाळी ठाण्याची खाडी याला लागून वाहत असे.

टीप: वरील लेखातील चूक दाखवल्याबद्दल श्री नितीन मोरे यांचे आभार.

Saturday, March 1, 2014

एक आवाहन

|| एक आवाहन ||

श्री शिवछत्रपतींनी जवळपास ३०० गडांवर राज्य केले. त्यापैकी बरेचसे गड त्यांनी स्वतः बांधवून घेतले, परंतु एकही गडावर त्यांनी आपले नाव कोरून ठेवले नाही. राज्यकर्ता असल्याने त्यांना हे शक्य होते, तर त्यांनी ते स्वकर्तृत्वाने इतिहासात कोरून ठेवले आहे आणि आम्ही करंटे कोठे एखादा दगड पहिला तर आमचे नाव मिळेल त्याने कोरून ठेवतो. का? तुमच्या मनात जर खरोखरच राजांबद्दल आदर असेल तर या वास्तू जोपासा, सांभाळा, पाळा. नपेक्षा स्वतःला भारतीय म्हणणे सोडून द्या.