Friday, May 30, 2014

भारतीय नौसेना १९४७ पर्यंत

तेराव्या शतकापासून ते इ. स.१९४७ पर्यंत भारताने नौसेनाक्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले नाही. याची कारणे म्हणजे दीर्घकालीन पारतंत्र्य व जमिनीवर होणाऱ्या लढाया ही होत. आठव्या शतकापासून ते सतराव्या शतकाअखेरपर्यंत हिंदुस्थानावर खुष्कीच्या मार्गाने परकीय आक्रमणे झाली. पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून पाश्चात्त्यांनी सागरामार्गे व्यापारी आक्रमणे करून शेवटी इंग्रजांनी हिंदुस्थानावर राज्य स्थापले. इ. स. पू. सु. सोळाव्या शतकापूर्वी म्हणजे आर्यांच्या आक्रमणापूर्वी सिंधू संस्कृतीचा सुमेर, अक्कड इत्यादींबरोबर सागरी व्यापार चाले. हा व्यापार निर्विघ्नपणे चालत असण्याचा संभव नाही; परंतु तत्कालीन नौसेना कशा असाव्यात, हे मात्र सांगता येत नाही. पुरातत्त्व उत्खननात सापडलेल्या मुद्रा व भांड्यांवरील नौकांच्या चित्रांवरून त्या काळी शिडांची जहाजे होती हे कळते. रामायणामध्ये (अयोध्याकांड ९५) नदीत लढणाऱ्या नौका व सेना यांचा उल्लेख आहे. महाभारतात नौसेना हे एक सेनांग आहे. ऋग्वेदामध्ये (मंडल १, ७ व १०) नौकांचे उल्लेख आहेत; परंतु त्यांचे स्वरूप कळत नाही. पुराण, जातक इ. वाङ्‌मयात नौका, सागरी व्यापार इत्यादींची वर्णने आहेत.

अर्थशास्त्रातील नावाध्यक्ष (२·२८) या प्रकरणात शत्रूच्या नौकांचा विध्वंस करावा असे म्हटले आहे; तथापि चाणक्याने नौसेनेचा उल्लेख केलेला नाही. पुराणांत व जातकादी वाङ्‌मयात नौका, नौकाबांधणी व पर्यटन यांचे उल्लेख आहेत. गुप्त, कलिंग, हर्ष, यादव, कदंब व शिलाहार इत्यादींच्या नौसेना असाव्यात. चौलांनी नाविक बळाचा उपयोग करून जावा, सुमात्रा व कंबोज या देशांत साम्राज्यविस्तार केला होता. अकबराच्या आइन-इ-अकबरीत मोगली नौसेनेची माहिती मिळते.

नौकाबांधणीबद्दल युक्तिकल्पतरु या मध्ययुगीन ग्रंथात माहिती मिळते. ज्या नौकांच्या लांबी-उंचीचे प्रमाण १० : १ व रुंदी-उंचीचे प्रमाण १·२५ : १ असते, त्या नौका अस्थिर असतात आणि ज्यांचे प्रमाण २ : १ व १ : १ असते, त्या संकट आणतात; असा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत नौशिल्पकल्पना अवास्तव वाटतात. संस्कृत ग्रंथ घटक-कारिका (१६ ते १८ वे शतक) व औरंगजेबकालीन फतिया-इ-इब्रिया या ग्रंथांत नौकांविषयी पुष्कळ वर्णने आहेत.

स्वतंत्र भारताच्या व पाकिस्तानच्या नौसेनांचे मूळ, १६१३ साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापिलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’ (इंडियन मरीन) या नौदलात सापडते. अरबी समुद्रात चाचेगिरी चाले. या चाच्यांशी मुकाबला करता यावा म्हणून ५ सप्टेंबर १६१२ रोजी दोन शस्त्रास्त्रयुक्त व्यापारी जहाजे ब्रिटिशांच्या सुरत वखारीत दाखल झाली; हीच इंडियन मरीनची सुरुवात होय. इंडियन मरीनमध्ये गुरब व गलबते (सु. ७५ ते ३०० टनभाराची) पुढे आली. त्यात हिंदू कोळ्यांची नौसैनिक म्हणून भरती केली जाई. खंबायतचे आखात, तापी व नर्मदा यांच्या मुखाजवळील सागरीक्षेत्राचे रक्षण हे काम मरीनकडे होते. सुरत, अहमदाबाद आणि खंबायत येथे नाविक प्रशिक्षण दिले जाई. १६१५ पर्यंत १० गुरब आणि गलबते काम करीत. १६२२ मध्ये इराणी आखातातील ओर्मुझ बंदर ‘मरीन’ ने ताब्यात घेऊन चाचेगिरीला बराच आळा घातला. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराशी इंडियन मरीनला लढावे लागले. ५ जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराजांच्या सुरतवरील हल्ल्या मरीनने तोफा डागून फॅक्टरीचे रक्षण केले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर शिवाजींनी जलदुर्ग बांधून ब्रिटिश, सिद्दी व पोर्तुगीज यांच्या सागरी सत्तेवर दडपण आणले. खांदेरीवरून मराठा आरमाराला हुसकावून लावण्यात इंडियन मरीन व इतर अयशस्वी झाले. १६८३ मध्ये सुरत सोडून मुंबईत इंडियन मरीनचा तळ हलविण्यात आला व त्यास ‘बाँबे मरीन’ हे नवे नाव देण्यात आले. १६८६ ते १७३६ पर्यंत मराठा आरमार व बाँबे मरीन यांच्यात पश्चिम किनाऱ्यावरील वर्चस्वासाठी सागरी लढाया चालू होत्या. ब्रिटिश शाही नौसेना, सिद्दी व पोर्तुगीज यांचे साहाय्य बाँबे मरीनला जर मिळाले नसते, तर मराठ्यांनी सरखेल आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर स्वामित्व स्थापले असते व हिंदुस्थानच्या इतिहासाला कदाचित निराळे वळण लागले असते. १६८० ते १७०७ या काळात मराठ्यांना जमिनीवर मोगलांशी निर्वाणीचा लढा द्यावा लागला, ही वस्तुस्थिती या संदर्भात महत्त्वाची ठरते. १७१६ च्या सुमारास बाँबे मरीनकडे २५ गुरब व गलबते होती. या नौकांवर एकूण ३८४ लहानमोठ्या तोफा होत्या. कमोडोर मॅथ्यूझ हा मरीनचा सरखेल होता. अठराव्या शतकात यूरोपात इंग्रज-फ्रेंच यांच्यामध्ये युद्धे चालू होती. त्यामुळे बाँबे मरीनची झपाट्याने प्रगती होत राहिली. १७३५ मध्ये मुंबईत हल्ली असलेल्या नाविक गोदीची बांधणी पुरी होऊन तेथे नौकाबांधणीस सुरुवात झाली. १७५० मध्ये सुकी गोदी तयार झाली. १७५१ मध्ये मरीनकडे ११ मोठ्या युद्धनौका, २५२ तोफा व पुष्कळ गलबते होती. १७४८ ते १७५६ च्या दरम्यान सरखेल संभाजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराचा धुव्वा उडविण्यासाठी ब्रिटिशांनी फार प्रयत्न केले. आंग्रे यांचा वरचष्मा पेशव्यांना सहन होत नसे. नानासाहेब पेशव्याने जमिनीच्या बाजूने व बाँबे मरीनने सागरी मार्गाने धेरीया ऊर्फ सुवर्णदुर्गावर चढाई करून आंग्र्यांचा पराभव केला. या लढाईत ब्रिटिशांचे रॉबर्ट क्लाइव्ह व वॉटसन हे अधिकारी होते. पेशव्यांनी अदूरदर्शीपणाने ब्रिटिशांना पश्चिम किनाऱ्यावर सत्ता स्थापण्यास आणि मराठा साम्राज्याचा ऱ्हास करण्यात मदत केली. १७६१ च्या सुमारास बाँबे मरीनला नाविक गणवेष देण्यात आला. त्यातील अधिकारी इंग्रज असत. नौसैनिकांपैकी ७५% सैनिक कोकणी असत. मराठा आरमाराचा निकाल लावल्यावर हैदर अलीची बंदरे बाँबे मरीनने जिंकली. एकोणिसाव्या शतकारंभी जावा, सुमात्रा यांवर हल्ले करण्यात मरीन यशस्वी झाले. १७९८ मध्ये मुंबई येथे मरीन बोर्ड स्थापण्यात आले. बोर्डाच्या आज्ञेप्रमाणे सागरी वाहतुकीचे संरक्षण, मुंबई बंदरात जलमार्ग दर्शन, सागरी सर्वेक्षण व जलालेखन इ. कामे मरीनला देण्यात आली. काठेवाड, सिंध, मकरान किनारा व इराणी आखाताचे जलालेखन मरीनने केले. १८२४ मध्ये मरीनने ब्रह्मदेशावरील आक्रमणात भाग घेतला. १८२९ साली लष्करी कायदा लागू करून ‘बाँबे मरीन’ ला ‘मरीन कोअर’ नाव देण्यात आले. अमेरिकेत झालेल्या राज्यक्रांतीमुळे ब्रिटिशांना तेथील उत्तम प्रकारचे लाकूड मिळणे अशक्य झाले. जहाज बांधणीस मलबारी सागवान लाकूड उत्कृष्ट गणले जाते. परिणामतः मुंबई बंदरात जहाजबांधणीस चालना मिळाली. मुंबईच्या याट (खेळाच्या बोटींच्या) क्लबपाशी सुक्या गोदीत जहाजबांधणीसाठी तीन घसरमार्ग बांधण्यात आले. येथेच २,५९१ टनभाराची मिआनी युद्धनौका बांधण्यात आली. १८३० साली ‘मरीन कोअर’ हे नाव बदलून ‘इंडियन नेव्ही’ (हिंदी नौसेना) हे नाव देण्यात आले. २० मार्च १८३० रोजी मुंबई गोदीत बांधलेल्या व वाफेवर चालणाऱ्या ह्यू लिंडसे नौकेला समुद्रात सोडण्यात आले. शीडयुक्त जहाजांना समुद्रात ओढून नेऊन वाऱ्यात सोडण्यासाठी वाफेवर चालणाऱ्या जहाजांचा उपयोग होत असे. शिडाच्या जहाजांच्या अस्तास सुरुवात होऊन वाफेची जहाजे हिंदी नौसेनेत भरती होऊ लागली. नौकांचा टनभार (६००–७०० टनभार) वाढीस लागून सु. २०·३२ सेंमी. च्या (८ इंची) भारी तोफा प्रचारात येऊ लागल्या. १८३९ मध्ये एडन बंदर ईस्ट इंडिया कंपनीने काबीज केले. १८४३ च्या सुमारास हिंदुस्थानी नौसेनेत वाफेची ११ फ्रिगेट व इतर १५ युद्धनौका होत्या. १८४५ साली मुंबईपाशी बुचर बेटावर नाविक तोफखाना शाळा सुरू झाली. शीख-इंग्रज युद्धात नौसेनेत मुलतान मोहिमेत भाग घेतला. १८५२–५६ मध्ये ब्रह्मदेश व इराण-मोहिमांत कामगिरी केली. 

१८५७ च्या उठावात नौसैनिकांचा पायदळासारखा उपयोग झाला. एका हिंदी सैनिकाला व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. उठावाचा विलक्षण परिणाम म्हणजे हिंदी नौसेनेचे विघटन होऊन मुंबई व कलकत्ता मरीन अशी दोन बिनलढाऊ नौकादले संघटित झाली. तारायंत्राच्या तारा समुद्रात सोडणे व जलालेखन करणे ही कामे त्यांस देण्यात आली. १८७७ मध्ये महाराणीचे ‘इंडियन मरीन’ उभारले गेले. हेदेखील बिनलढाऊच होते. काही पाणतीर नौका मरीनला मिळाल्या. ईजिप्त व ब्रह्मदेश यांवरील आक्रमणात मरीनने वाहतुकीचे काम सांभाळले. १८९० मध्ये मुंबईत एक पाणतीर गोदी बांधण्यात आली. १८९२ मध्ये इंडियन मरीन नाव जाऊन ‘शाही हिंदी मरीन’ हे नाव मिळाले. १८९६ ते १९०४ या काळात पूर्व आफ्रिकेत व बोअर युद्धात या मरीनने बिनलढाऊ कामे केली. पहिल्या महायुद्धात मरीनच्या बिनलढाऊ नौकांचे हत्यारी नौकात रूपांतर झाले. या युद्धाच्या अखेरीस ५०० ब्रिटिश अधिकारी व १३,००० सैनिक मरीनच्या सेवेत होते. १९१८ साली लढाऊ कारवाया करण्यास मरीनला समर्थ करावे व त्यासाठी मरीनला युद्धनौका पुरवाव्या अशी ब्रिटिश शाही नौसेनेच्या कार्यालयाला अ‍ॅड्‌मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड जेलिकोने शिफारस केली; परंतु अ‍ॅड्‌मिरल मॉवबी याच्या नेमणुकीशिवाय दुसरी भरीव कामे पुढे ढकलण्यात आली. पुन्हा १९२५ मध्ये जनरल रॉलिन्सन, अ‍ॅड्‌मिरल सर रिचमंड व कॅप्टन हेडलम या तिघांच्या समितीने पुढीलप्रमाणे शिफारसी केल्या : मरीनऐवजी शाही हिंदी नौसेना नाव द्यावे. ४ स्लूप युद्धनौका, २ गस्ती, ४ ट्रॉलर, २ सर्वेक्षण व १ भांडार अशा १३ नौका नौसेनेत असाव्या इत्यादी. ११ नोव्हेंबर १९२८ रोजी शाही हिंदी नौसेना कार्यान्वित झाली. ध्वज ब्रिटिशांच्याच सेनेसारखा होता व त्यात एकही हिंदी अधिकारी नव्हता. सैनिक मात्र कोकणी व बंगाली होते. १९२८ साली केंद्रीय विधानसभेत हिंदी नौसेना-शिस्त कायदा विचारासाठी आला; पण तो एकमताने फेटाळला गेला. शेवटी ८ सप्टेंबर १९३४ रोजी कायदा संमत झाला व २ ऑक्टोबर १९३४ रोजी मुंबईत हिंदी नौसेना कायदेशीरपणे प्रस्थापित झाली आणि २,००० वर्षांच्या भारतीय सागरी परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. १९३४ पासून आगामी यूरोपीय महायुद्धाची चाहूल लागली. अ‍ॅड्‌मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड चॅटफील्ड याच्या नौसेनासुधारणा शिफारशी तत्काळ मंजूर झाल्या. नौसेनेच्या वाढीस व आधुनिकीकरणास गती मिळाली. अ‍ॅड्‌मिरल सर हरबर्ट फिट्‌सहरबर्ट हे नौसेनापती झाले. राखीव व स्वयंसेवक दले उभारण्यात आली. उमेदवारांकरिता नाविक प्रशिक्षणाची सोय झाली. १९४५ अखेर हिंदी नौसेनेत १५ युद्धनौका (स्लूप, फ्रिगेट व कॉर्व्हेट) आणि ४५७ इतर पूरक नौका, ३,०४४ नाविकाधिकारी व २७,४३४ नौसैनिक होते. मुंबई, कलकत्ता, विशाखापटनम्, कोचीन व मद्रास येथे मुख्य नाविक तळ होते. विविध प्रकारच्या नाविक प्रशिक्षणाच्या संस्था पुढील ठिकाणी होत्या. पाणबुडी विरोधी अधिकारीप्रशिक्षण व संदेश दळणवळण संस्था, मुंबई; तोफखाना, कराची; अभियांत्रिकी, ठाणे व तुर्भे आणि लोणावळा; प्रशिक्षणव्यवस्था, मुंबई व कराची; रडार, कराची. दुसऱ्या महायुद्धात हिंदी नौसेनेच्या पठाण, पार्वती व सिंधू या तीन युद्धनौका कामास आल्या. १९४१ मध्ये मुंबईहून प्रमुख नौसेना कार्यालय दिल्लीला हलविण्यात आले. १८ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबई येथे नौसेनेने बंड पुकारले. युद्धानंतर नौसेनेत झालेली व होणारी सैनिककपात व भविष्यकाळाची काळजी ही बंडाची कारणे होती. हिंदुस्थानातील राजकीय असंतोषाची छायाही बंडवाल्यांवर पडली होती. शेवटी राजकीय पुढाऱ्यांनी सैनिकांची मने वळविली.

माहिती साभार : मराठी विश्वकोश

Saturday, May 24, 2014

Shaniwarwada by William Carpenter

Shaniwarwada by William Carpenter

Dated between Jun - Dec 1850

http://collections.vam.ac.uk/item/O108183/gateway-to-the-shanwar-palace-painting-carpenter-william/


Wednesday, May 21, 2014

RIP M P Anil Kumar

During 9th or 10th STD, in my English textbook, I had a chapter titled, Airborne to Chairborne.

It was an autobiographical account of a fighter pilot, who due to a tragic injury, became paralysed below his neck.

It was the most emotional prose I had ever read, and made me realise how life can turn in a second. But after the tears have been shed, your heart starts to glow. It was his will to live on which makes you realise something. No matter how harshly life treats you; You owe it to yourself, you owe it to your parents who sacrificed for you, and you owe it to every friend who believed in you, to get back up and keep on fighting.

Yesterday Flying Officer M P Anil Kumar took off on his final sortie into the sunset. Forever.

RIP Sir.
And thank you for inspiring millions like me.




Tuesday, May 20, 2014

गारगोटीयुक्त बंदुकीच्या काही भागांची नावे

गारगोटीयुक्त बंदुकीच्या काही भागांची नावे.

A. चाप - lock, इथे अर्थ "जबडा" असा आहे. चापात गारगोटी धरली जाते. तसेच याला अजून एक भाग आहे, फिरकी - screw, ज्याला फिरवून चापात ठेवलेली गारगोटी घट्ट केली जाते.
B. गारगोटी - flint. याचा वापर आगीच्या ठिणग्या काढण्यासाठी होतो.
C. घोडा - hammer/cock. (आणि आज आपण बंदुकीला घोडा म्हणतो :P )
D. चाप - trigger. लक्ष्य देण्यासारखी गोष्ट आहे की दोन वेगळ्या पुर्ज्याना एकच नाव आहे.
E. कमाण/(न) - spring. (अगदी घडाळ्याच्या स्प्रिंगला सुद्धा कमान म्हणतात)
F. पेला आणि कान - priming pan and touchhole.
बंदुकीच्या नळीतल्या दारूला पेट देण्यासाठी नळीला एक छोटं छिद्र कोरलं जातं. हा असतो "कान".
या कानाच्या समोर एक छोटंसं पोकळ भाग असतो, म्हणजेच "पेला". यात चिमुटभर दारू ठेवली जाते. पेल्यातली दारू पेटली की त्याची ज्वाला नळीत पोहोचते, आणि नळीतल्या दारूचा विस्फोट होतो.
G. नळी - barrel. बंदुकीची नळी. यात क्रमाने दारू आणि गोळी ठासली जाते.
H. याला Frizzen किंवा Steel म्हणत. याचं मराठी नाव मिळत नाही. इंग्रजी L आकाराचा हा पुर्जा आहे. याच्या उभ्या भागावर नेलकटर सारखे कानस(file) असते. यावर गारगोटी घासली की त्यातून निघणाऱ्या ठिणग्या पेल्यात पडतात. याच्या आडव्या बाजूचं काम पेल्याला झाकून त्यातील दारू खुश्क ठेवण्यापुरते होते.
टीप : चित्रामध्ये या Frizzenचा "L" आडवा पडला आहे.

Sunday, May 18, 2014

जुनी विक्रांत, नवी विक्रांत

जुनी विक्रांत, नवी विक्रांत

- विनायक तांबेकर

भारत-पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली 'विक्रांत' ही विमानवाहू युद्धनौका मोडीत काढली जाणार होती. परंतु, त्याला आता सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली आहे. दुसरीकडे भारतीय नौदलाने नवी विक्रांत बनवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. २0१७-१८मध्ये नवी आयएनएस विक्रांत नौदलात कार्यरत होईल. नवी विक्रांत पूर्वीच्याच दिमाखात पुन्हा एकदा नौदलाचे भूषण बनेल, यात शंका नाही.

भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू नौका (एअरक्राफ्ट कॅरियर) आय. एन. एस. विक्रांत मोडीत निघण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणारी 'विक्रांत' आता दिसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या युद्धनौकेवर इतिहासाला उजाळा देणारे संग्रहालय उभारावे, अशी कल्पना होती; परंतु नंतर ही युद्धनौका मोडीत काढून भंगारात देण्याची वेळ येऊन ठेपली होती. त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने 'विक्रांत जैसे थे' स्थितीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.
भारतीय नौदलाने ही विमानवाहू नौका ब्रिटिशांकडून खरेदी केली. त्या वेळी तिचे नाव एच. एम. एस. 'हर्क्युलिस' होते. विक्रांतची लांबी ७०० फूट, रुंदी १२८ फूट असून, तिचा १६ हजार टनांचा डिसप्लेसमेंट होता. त्या काळात १९५५ ते १९६५ ही युद्धनौका प्रचंडच समजली जात असे. विक्रांत नोव्हेंबर १९६१ मध्ये भारतात आले. त्या वेळी मुंबईच्या नौदल गोदीतील बॅलार्ड पियर येथे विक्रांतचे जंगी स्वागत झाले होते. पंतप्रधान पंडित नेहरू स्वत: या समारंभास हजर होते. विक्रांतचे पहिले कमांडिंग आॅफिसर कॅप्टन प्रीतमसिंग होते. तर, विमानाच्या विभागाचे प्रमुख लेफ्टनंट राम तहिलीयानी होते. हेच पुढे भारतीय नौदलाचे प्रमुख झाले, हा योगायोग म्हणावा का?
पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस सागराने वेढलेल्या भारत देशाच्या नौदलात कमीत कमी दोन विमानवाहू नौका असाव्यात, असे सर्वांनाच वाटत होते; परंतु विमानवाहू नौका असणे आणि त्याची देखभाल करणे फार खर्चिक काम असते. तरीसुद्धा त्यावेळचे नौदलप्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल कटारी यांच्या आग्रहाने पं. नेहरूंनी विक्रांत खरेदीस हिरवा कंदील दाखविला. भारतीय नौदलाच्या इतिहासात मराठी दर्यावर्दी अधिकाºयांचे मोठे योगदान आहे.
विक्रांत भारतात आल्यानंतर लगेचच ३ वर्षांत १९६५ चे भारत-पाक युद्ध झाले. त्या वेळी विक्रांत मुंबईच्या नौदल गोदीत रिफीटसाठी होते; मात्र पाकिस्तान मीडियाने पाक नौदलाने विक्रांत बुडविल्याचे जाहीर केले होते! विक्रांतवरच्या विमानांना मुंबईच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर १९७१ च्या बांगलादेश निर्मिती युद्धात विक्रांतने आपले योगदान चोखपणे दिले. पूर्व पाकिस्तानातून व्यापारी जहाजामधून लपूनछपून पाकिस्तानला परत जाण्याचा डाव विक्रांतच्या विमानांनी हाणून पाडला. पूर्व पाकिस्तानातील पाक सैन्याचा पराभव जेव्हा अटळ झाला. त्या वेळी त्यांच्या पुढे फक्त शरणागतीचा पर्याय होता. विक्रांतच्या सी हॉक, अ‍ॅविझे विमानांनी चिटगाव कॉक्स बझार, खुलना इ. बंदरांवर तुफान बॉम्ब हल्ले करून बंदरे निकामी केली. त्यामुळे पश्चिम पाकिस्तानला पळून जाण्याची त्यांची योजना निष्फळ ठरली. भारतीय सेनादलाच्या इतिहासातच नव्हे, तर जगाच्या इतिहासात न भूतो न भविष्यति अशी ९० हजार पाक सैनिकांची शरणागती भारतीय सेनादलाने २१ डिसेंबर १९७१ रोजी ढाक्यातील एका समारंभात स्वीकारली ! हा दिवस अजूनही भारतीय सेना विजय दिवस म्हणून साजरा करते. त्या वेळी सुरुवातीला विक्रांत अंदमान - निकोबार बेटाजवळ उभे करण्यात आले होते. त्यानंतर ते पूर्व पाकिस्तानच्या नजीकच्या समुद्रात उभे करण्यात आले. या संग्रमात नौदल अधिकाºयांनी आणि सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल २ महावीर चक्र आणि १२ वीर चक्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर १९९७ पर्यंत म्हणजेच सेवेतून निवृत्त होईपर्यंत विक्रांतला सागरी युद्धाची संधी मिळाली नाही. परंतु, त्या आधी विक्रांत सदिच्छा भेटीवर मध्य पूर्व आणि दक्षिण एशिया देशामध्ये जाऊन आले होते. काळानुसार विक्रांतची टरबाईन्स इंजिने आणि इतर यंत्रणा कालबाह्य आणि जुन्या होत गेल्या. या ३६ वर्षांच्या कालावधीत विक्रांतने ४ लाख ९० हजार नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास केला होता. अखेर ३१ जानेवारी १९९७ रोजी समारंभपूर्वक विक्रांतला नौदलातून निवृत्त (डी कमिशन) करण्यात आले. त्याच वेळी हे जहाज मोडीत काढण्यापेक्षा यावर नौदलाचे संग्रहालय करावे, अशी कल्पना मांडली गेली. असे सांगणे सोपे आहे. परंतु या जहाजासाठी जागा, त्यावर ठेवण्याच्या वस्तू आणि त्याची देखभाल यासाठी लागणारा सेवकवर्ग, त्यांचा खर्च, तसेच संग्रहालय बघायला येणाºयांची सुरक्षितता आणि नौदल सुरक्षितता या सर्व गोष्टींचा सखोल विचार करणे गरजेचे होते. १९९८-९९ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचे युती सरकार होते. विक्रांतवर संग्रहालय सुरू करण्यास ६५ कोटी रुपयांची गरज होती. बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून निधीची तरतूद करण्यास सांगितले. दुसºया दिवशी बाळासाहेबांचा विक्रांतवर फोटो आला आणि विक्रांत वाचल्याची बातमी! हे म्युझीयम नौदलाने उभे केले. त्यामध्ये भारतीय नौदलाचा इतिहास, विमानांच्या प्रतिकृती, मिसाईल इ. हे संग्रहालय पुढे ८/१० वर्षे चालू होते. परंतु, दिवसेंदिवस म्युझियमचा देखभालखर्च वाढत होता. अखेरीस आॅगस्ट २०१३ मध्ये मुंबईच्या नौदल पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल सिन्हा यांनी विक्रांत मोडीत काढण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. केंद्राने ती मान्य केली आणि विक्रांत मोडीत काढण्याचा निर्णय झाला. विक्रांतवरील म्युझियम पुढे चालू ठेवण्यासाठी कोणतीही खासगी कंपनी किंवा राज्य सरकार पुढे आले नाही. कारण त्यावरील होणारा खर्च. केंद्र सरकार आणि नौदल मुख्यालयाच्या विक्रांत मोडीत काढण्याच्या निर्णयाविरुद्ध 'विक्रांत वाचवा' समितीतर्फे किरण पैगणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. (नोव्हे. २०१३) ती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. समितीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि आता विक्रांत भंगारात काढण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे.
दरम्यान, विक्रांतचे नाव व परंपरा चालू ठेवण्यासाठी नौदलाने आणि केंद्र सरकारने नवीन विमानवाहू नौका भारतातच तयार करण्याचा निर्णय घेतला. जगातील फक्त ५/६ देशच एअरक्राफ्ट कॅरियरची निर्मिती करू शकतात. भारत त्यापैकी एक आहे. या विमानवाहू नौकेच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, तंत्रज्ञ, स्पेशालिस्ट इंजिनियर्स, डिझायनर्स आणि खास उपकरणाची गरज असते. विक्रांतच्या देशांतर्गत निर्मितीचा निर्णय घेतल्यानंतर (१९९८- ९९) तब्बल १० वर्षांनी (२००५-२००६) कोची येथील नौदल गोदीत विक्रांत उभारणीस प्रारंभ झाला. गेले ८ वर्षे नव्या विक्रांतवर कोची गोदीत काम चालू असून, त्याची चाचणी २०१६ मध्ये होईल. त्यानंतर २०१७ मध्ये हे नवे आधुनिक पुनरुज्जीवित विक्रांत भारतीय नौदलात सामील होईल. त्यावरची विमानेही आधुनिक असतील. रशियन बनावटीची आणि भारतात निर्माण केलेली असतील. लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (नौदलासाठी) ही विमाने आणि हेलिकॉप्टर त्यावर असतील. या जहाजाच्या निर्मितीसाठी ४ हजार टन स्पेशल स्टील लागते. यावरून नव्या विक्रांतच्या भव्यतेची कल्पना यावी. थोडक्यात, २०१७-१८ मध्ये दोन शक्तिशाली विमानवाहू नौका आय.एन.एस. विक्रमादित्य आणि आय.एन.एस. विक्रांत आपल्या नौदलात कार्यरत राहतील. नवी विक्रांत त्याच दिमाखात पुन्हा एकदा नौदलाचे भूषण बनेल, यात शंका नाही.
(लेखक निवृत्त कर्नल आहेत.)

लोकमत मंथन, पान ४

Saturday, May 17, 2014

उपेक्षित जलदुर्ग

उपेक्षित जलदुर्ग
- अ‍ॅड. श्रीपाद भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता साडेतीनशे वर्ष उलटली आहेत. महाराजांच्या द्रष्टेपणाला मुजरा करण्यासाठी जलमार्गाने दुर्गभ्रमंतीचे आयोजन ‘सेक्रेड हार्ट स्कूल, कल्याण’ व ‘गिरिविराज हायकर्स’ यांच्या सहकार्याने केले होते.
खाडी मार्गाने प्रवास करायची ही पहिलीच वेळ होती, तेव्हा थोडं कुतूहल आणि आनंद होत होता.
सकाळचे दहा वाजले होते, भरतीची वेळ झाली होती. लगबगीने आमचे आधुनिक मावळे गलबतावर आले.
शिडे उभारली गेली.
कल्याण-डोंबिवली खाडी मार्ग तसा उथळ असून ब-याच भागात खडक डोकावत असतात. हे खडक चुकवत आमचा प्रवास सुरू झाला.
डोंबिवलीच्या बंदरात दोन्ही बाजूला लाल, पिवळे झेंडे फडकत असलेल्या होड्या जणू आमचं स्वागतच करत होत्या. थोडं पुढे येताच पारसिकचा किल्ला व त्या मधोमध असलेल्या मुंब्रादेवीचं दर्शन झालं.
छत्रपती संभाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पारसिक किल्ल्याला खाडीतून पाहताना वेगळाच आनंद होत होता.
सोबतीला खाडी किना-यावरील गर्द झाडी होती. कॅमे-यातून हा निसर्ग टिपत आमचा प्रवास सुरू होता.
आता मात्र घाई करावी लागणार होती, कारण कळवा व ठाणे या खाडीत मोठा खडक होता. हा खडक पार करायचा असल्यास भरती चुकवून चालणार नव्हते. जर भरती चुकली तर पुन्हा सात-आठ तास भरतीची वाट बघावी लागणार होती.
खडकावरील चिंचोळ्या जागेतून वाट काढत होडी पुढे जात होती. तर होडीवर असणारा तांडेल खडक चुकवण्यासाठी प्रचंड खटपट करत होता. एवढ्यात दगडावर बोट आदळल्याचा आवाज झाला. सगळे एकदम स्तब्ध झालो. लागलीच बोटीचं इंजिन बंद करण्यात आलं.
अक्षरश: पंधरा मिनिटं होडीला काठीने पुढे ढकलण्यात आले.
तांडेलाने पाण्यात उतरून बोटीची स्थिती पाहिली, पण सुदैवाने काही मोडतोड झाली नव्हती. अखेर आम्ही वाशीच्या प्रशस्त खाडीत शिरलो. एका बाजूला पारसिकची डोंगररांग व दुस-या बाजूला उंच गगनचुंबी इमारती दिसत होत्या. खाडीत
रेती काढणा-या बार्ज रांगत होत्या. संध्याकाळचे चार वाजले होते. एलिफंटा बेटाला मागे सोडत आम्ही अरबी सागराच्या कुशीत झेपावत होतो. आता आम्हाला प्रचंड मोठी मालवाहू जहाजं दिसू लागली. गेट वे ऑफ इंडियाजवळ पर्यटकांना
फिरवणा-या होड्या दिसत होत्या.
समुद्रावरचं खारं वारं अंगाला झोंबत होतं. अंधार पडता-पडता खांदेरी-उंदेरी जवळ केलं. पण बराच अंधार झाल्यानं इथं न थांबता कोर्लई व रेवदंड्याच्या पायथ्याशी छोटय़ा खाडीत नांगर टाकायचा ठरवला.
रात्रीचे नऊ वाजले होते. खाडीत असणा-या खडकांचा अंदाज घेत गलबत खाडीत शिरत होते.
दिवसभराच्या थकव्यामुळे डोळे कधी मिटले ते कळलेच नाही. पहाटे बंदरातील होड्या मच्छीमारीसाठी सागराकडे निघाल्या असताना आमची कोर्लईचा पूर्व किनारा गाठण्याची लगबग सुरू झाली. पण खडक व चिखलातून पुढे सरकता येईना. शेवटी तिथल्या होडीला हाक देऊन त्या छोट्या पडावातून किनारा गाठला. गडाच्या पायथ्याशी मोठा कोळीवाडा आहे.
येथूनच गडावर जाणारी वाट आहे. गडाची उंची शंभर मीटर एवढी आहे.
किल्ला उभा राहण्यापूर्वी ही जागा ‘चौलचा खडक’ म्हणून ओळखली जायची. काही काळ मराठ्यांचा तोफा बनवण्याचा कारखाना याच किल्ल्यावर होता. आजही गडावर गंजलेल्या तोफा पाहायला मिळतात. तटा-बुरुजांमध्ये झाडेवेली वाढल्याने तटबंदी ढासळत असल्याचे दिसत होते.
हिंदवी आरमाराचे काही काळ असलेलं हे ठाणं पाहून आम्ही पद्मदुर्ग-जंजि-याच्या प्रवासाला निघालो. भूमार्गाने कोर्लई ते मुरुड अंतर साधारण सत्तावीस किमी आहे. सागरी प्रवासात मात्र भरती-ओहोटीचं भान राखणं महत्त्वाचं असतं.
अखेर दुपारी दोन वाजता दांडा-राजापुरी जेटी येथे पायउतार झालो. तिथे जमलेल्या कोळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारून आम्ही सुवर्णदुर्गच्या दिशेने गलबत हाकारलं.
या टप्प्यात आम्हाला डॉल्फिनची सोबत होती. त्यांचे भरपूर फोटो काढता आले.
सुर्वणदुर्ग गाठल्यावर सामोरे आलेल्या राजेश लिंगायत यांची आम्हाला मोलाची मदत झाली. किल्ला आमच्या बरोबर स्वत: फिरायला आले. एकेकाळी स्वराज्यातील महत्त्वाचा आरमारी किल्ला असलेल्या या जलदुर्गात आता भरपूर रान माजले आहे. दुर्गप्रेमी वगळता इतरांकडून दुर्लक्षित अवस्थेतील हे जलदुर्ग आज उपेक्षित आहेत, याचीच खंत मनात घेऊनच जड पावलांनी परतीची वाट धरली.

PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: 10 March, 2010
http://archive.prahaar.in/dil_se/21282.txt

Friday, May 16, 2014

Krishnarao (Babasaheb) Dhulap II - कृष्णराव (बाबासाहेब) धुळप, दुसरे

Krishnarao (Babasaheb) Dhulap II - कृष्णराव (बाबासाहेब) धुळप, दुसरे

Great grandson of Aanandrao Dhulap. He succeeded to the Jagir and Inam of Vijaydurg in 1874 after the death of his father Raghunathrao Dhulap.
Image must be from (or before) 1912.

आनंदराव धुळप यांचे पणतू. वडील रघुनाथराव यांच्या निधनानंतर, १८७४ साली, हे विजयदुर्ग येथील इनाम आणि जहागिरीचे धनी झाले.
छायाचित्र अंदाजे १९१२ किंवा त्या आधीचे असावे.

संदर्भ : मराठा कुलांचा इतिहास, १९१२

Thursday, May 15, 2014

Kanhoji Angre - Manohar Malgaonkar | कान्होजी आंग्रे - मनोहर मळगावकर

१८व्या शतकाच्या सुरुवातीला जमिनीवर कोणाचीही सत्ता असो. खंदक आणि भिंतीच्या बंदोबस्ताआड असणाऱ्या व्यापारी वसाहतीवर कोणाचीही मालकी असो. पण कोंकणच्या पाण्यावर सत्ता कोणाची होती यात दुमत नव्हतं.
सत्ता होती ती फक्त "कान्होजी आंग्रे" यांचीच.....

कान्होजी आंग्रे- मनोहर मळगावकर
, अनुवाद - पु.ल. देशपांडे



Wednesday, May 14, 2014

An unknown piece of Indian Maritime History

Yesterday I attended a lecture by Prof. Ranabir Chakravarti. The subject was "India and the Indian Ocean: Issues in the History of Politics (upto c. 1500 CE)."

Beginning from Mauryas he takes us through Satavahanas, Kadambas, Shilaharas, right upto Vasco da Gama's arrival at Calicut.

One of the most interesting things which I learned here was about a manuscript by Guillelmus Ade (William of Adam), titled "Tractatus quomodo Sarraceni sunt expugnandi." Which is a latin treatise roughly translated as "How to Defeat the Saracens." 'Saracens' here being the Mamluk Sultanete of Egypt in particular, and Arabs of Middle East in general.

The treatise, which is very polemical in nature, lays a five-fold strategy to destroy the Saracens and capture the holy land. Each of these strategies are elaborated in great detail in independent sections. The last and the most interesting strategy of these is an excellent example of naval strategy, probably on par with R.Adm Alfred Mahan, or Sir Julian Corbett.

Why is it "the most interesting" of the lot? Check out the two quotes from the text below.

"No one questions how great a profit the Saracens of Egypt derive from India by the maritime trade across the ‘Indian sea’ (mari Indico)."
// Note - 'Indian' not 'Arabian' sea.

"For all of the things that are sold in Egypt, such as pepper, ginger and other spices; gold and precious stones, silk and those precious materials dyed with the colors of India; and all other precious things are carried from India to Egypt. .... Therefore, anyone can observe, as I said before, that India is truly and effectively, and not casually or occasionally, the source of all the evils which I described above."

It should be noted that the author was not some tom-dick-&-harry who had an over-inflated opinion of his own skills. He was a Dominican Friar at the beginning of his career. And had lived at Smyrna (Aegean Sea), Constantinople (1307), Syria, and Sultanieh (in Persia under Ilkhanid rule). By his own admission he had " traversed the entire empire (of Persia) as far as it extends."

Prof. Chakravarti has rightly titled this section "Blueprint of a Naval Blockade". This entire treatise was intended for the Pope's eyes. One among many such similar treatises produced during that era. However, nothing seems to have been done about this.

There's quite a lot to write on this subject, but I'll end here. To read more on the subject, please go through the links below.

An article by Prof Chakravarti concerning the above mentioned text -
INDIA AND THE WESTERN INDIAN OCEAN: GLEANINGS FROM A FOURTEENTH CENTURY LATIN CRUSADE TRACT
http://jhss.org/articleview.php?artid=221

Sample preview of ebook -
How to Defeat the Saracens, William of Adam; Text and Translation with Notes. - by Giles Constable
https://www.academia.edu/5929775/How_to_Defeat_the_Saracens_William_of_Adam_Text_and_Translation_with_Notes

Prof. Ranabir Chakravarti's Academia account.
https://independent.academia.edu/RanabirChakravarti

गाबती/गाबीत

गाबती/गाबीत -

या जातीची लोकसंख्या (१९११) २४,८१८. रत्नागिरी व कानडा जिल्ह्यांतील समुद्रकांठचा प्रदेश व सांवतवाडी संस्थान येथें हे लोक आढळतात. यांचीं गाबीत किंवा ग्राबती अशींहि दुसरी नांवे आहेत. गाबती हें नांव पडावयाचें कारण असें सांगतात कीं शिवाजी महाराजांनीं आरमार तयार केलें. त्यावेळीं त्यांत तिर्कटीतारूं, गलबत, मचवा, पडाव, शिबाड, होडी, डोण, पगार व ग्राब अशीं निरनिराळीं गलबतें होती. ग्राबजहाज हें लढाऊ असे. त्यावर तोफा असत. ग्राब (गुराब) हा आरबी शब्द आहे. त्याचा अर्थ गनबोट होय. या ग्राबावर जे लढाऊ मराठे कोंकणी नोकर राहिले ते हे ग्राबती होत. गाबीत हा शब्द खरा नाहीं (हा सेन्सस रिपोर्टांत येतो.) ग्राबती व गाबती एकच. आम्हीं कोंकणी मराठे असून आमचे पूर्वज पूर्वी शिवाजीच्या आरमारखात्यांत नोकर होते असें हे म्हणतात. म्हणून जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले या पूर्वीच्या आरमाराच्या ठिकाणीं यांची वस्ती जास्त आहे. पेशवाई बुडाल्यानंतर त्यांनीं कोळ्याचा धंदा सुरू केला असें म्हणतात. १७६० च्या अगोदर व त्यानंतर सुमारें ४० वर्षेपर्यंत हे लोक दर्यावर्दीपणाचा धंदा करीत होते. यांच्या बायकामुलांनीं (पुरुष आरमारावर नौकर असल्यामुळें) शेजारी रहात असलेल्या कोळ्यांचा धंदा व मोलमजुरी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळें मराठे व या लोकांचा संबंध दुरावला. साठसत्तर वंर्षापूर्वी मराठ्यांचा व यांचा रोटीबेटीव्यवहार असे पण हल्ली नाहीं. त्यावेळीं मालंडकर परब (ग्राबती) यांची मुलगी विजयदुर्गाच्या धुळपांकडे दिली होती असें म्हणतात. यांचीं आडनांवेंहि मराठ्यांच्या आडनांवांची आहेत. वेंगुर्ले येथें कुबल आडनावांचीं पांच घराणीं असून त्यापैकीं चार मराठे व एक गाबती आहे. मानमरातब पंचांनांहि सारखाच मिळतो. हुद्यांचीं दर्शक आडनांवें यांच्यांत आहेत तीः- तांडेल, साततांडेल, पडतांडेल, फडतांडेल, तिळतांडेल, मायनाक, नाईक, पडनाईक, फडनाईक, महालनाईक, मुकनाईक, सारंग, मोठेसारंग, बुड्ये इत्यादि. या लोकांमध्यें कुळें व देवकें आहेत व त्यावरून ते मूळचे मराठे असण्याचा फार संभव दिसतो. मासे पकडून विकणें व दर्यावर्दीपणा करणें हे त्यांचे परंपरागत धंदे होत. यांमध्यें गोत्रेंहि आहेत. परंतु त्यांचा उपयोग होत नाहीं. विवाहाच्या चालीरीति वेगवेगळ्या आहेत. यांच्या गलबतांवरील विशिष्ट दोर्‍यांचीं नांवे शिवाजी, संभाजी, शाहू, गाई, वासरूं अशीं असतात. पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत यांच्या गलबतावर तोफा असत. त्यावेळीं महादू बुदबाराव कुबल नांवाच्या गृहस्थाच्या हातून तोफेच्या अपघातानें एक बाई मेल्यामुळें तेव्हांपासून तोफा ठेवण्यास बंदी झाली. ग्राब ठेवण्याच्या जागेस गुराब देवणें म्हणतात. यांची कुलदैवतं महादेव व पार्वती होत. यांच्या सर्व चालीरीती मराठ्यांप्रमाणेंच आहेत असें म्हणतात. कुळांवरून लग्नें ठरतात. कळंब, आंबा वगैरें देवकें यांच्यांत आहेत. आतेबहिणीशीं लग्न करण्यास उलट सांखळी म्हणतात. लग्नाच्या वेळीं नव-याच्या डोक्यावर उलट धार करून शस्त्र धरतात. लग्नानंतर वधुवर कोण्या तरी इष्ट मित्राच्या घरीं पाहुणचारास जातात. तेथें रात्रीं एकांतांत वरास आपली अंगठी वधूस द्यावी लागते. लग्नाच्या वेळीं वरास जानवें देतात. पुढें धंद्याच्या गैरसोयीमुळें तें खुंटीस ठेवतात. विवाहादि सर्व संस्कार ग्रामजोशी ब्राह्मण उपाध्याय करतो. या जातीच्या रखेलीपासून झालेली संतति मराठा जातींत मोडते; त्यांची निराळी जात नाहीं. मात्र अशा पहिल्या पिढीस बंदा म्हणतात व त्यापुढील संतति आस्ते आस्ते पक्क्या मराठ्यांत मोडते. त्यांच्यापैकीं कांही वारकरी व रामदासी पंथाचे आहेत. यांच्या गांवोगांवी पंचायती होत्या व सर्वसाधारण पंचायत मालवणास होती. तिचा अध्यक्ष वंशपरंपरेचा असतो. हल्ली फार थोड्या पंचायती शिल्लक आहेत. पूर्वी निवाडे लिहून ठेवण्याची पद्धति होती. निकाल न पाळल्यास गुडगुडी, पाणी, विस्तव, रोटीव्यवहार हे बंद करणें किंवा दंड करणें या शिक्षा असत. कांहीं गांवी जातीचीं मालकीचीं देवस्थानें आहेत. जातीचा कर नाहीं. ब्राह्मण, मराठे व वाणी यांच्या बरोबर यांचा अन्नोदकव्यवहार चालतो. यांच्यांत पोटजाती नाहींत. संकेश्वर मठ हा या जातीच्या धर्मगुरूचा मठ होय. यांच्यांत दोन शिक्षणविषयक फंड आहेत. या जातीबद्दल एन्थॉलॉजिकलसर्व्हे डिपार्टमेंटकडून चौकशी होत असतां ''आमच्या जातीपैकीं कोणाहि गृहस्थाचा सल्ला घेण्यांत आला नाहीं; उलट प्रतिस्पर्धी जातीकडून भलती नालस्ती करणारी चुकीची माहिती मिळवून सरकारनें मोनोग्राफ छापला. तो छापला गेल्यावर जातींतील पुढार्‍यांनीं एन्थॉ. डिपार्टमेंटला अर्ज करून त्यांत केलेल्या खोट्या विधानांबद्दल तक्रार केली व खरीखुरी माहिती पुराव्यानिशीं सादर केली. परंतु मोनोग्राफ पूर्वीच छापून निघाल्यामुळें त्याचा कांहीच उपयोग झाला नाहीं.'' असें रा. कृ. वि. कुबल म्हणतात. (सेन्सस ऑफ इंडिया १९११ व्हॉ. ७; रा. कृ. वि. कुबल यांनीं पुरविलेली माहिती.)

साभार : केतकर ज्ञानकोश

Tuesday, May 13, 2014

आरमाराचे सुभेदार धुळप यांच्या घराण्याची त्रोटक माहिती

आरमाराचे सुभेदार धुळप यांच्या घराण्याची त्रोटक माहिती.

धुळप यांचें मूळचें उपनांव मोरे, हे मूळ उत्तर हिंदुस्थानांतील रहिवासी. ह्या घराण्यांतील परसोजी बाजी व जयाजी बाजी या उभयतां बंधूंनीं सह्याद्रीच्या पूर्वेस कृष्णा व वारणा या दोन नद्यांच्या मध्यें जावळीं व त्याच्या सभोंवतालचा मुलूख काबीज करून, जावळी हें आपल्या राहण्याचें ठिकाण केलें. परसोजीस पांच पुत्र झाले. (१) हणमंतराव, (२) बागराव, (३) कमलराव, (४)सुर्याजीराव व (५) चंद्रराव. जयाजी हा निपुत्रिक होता. शिवाजीच्या कारकीर्दीत चंद्रराव, सूर्याजीराव व हणमंतराव ह्या त्रिवर्गांचा शेवट झाला, नंतर हणमंतराव याचे मुलगे खेमाजी व चायाजी; बागराव याचा प्रतापजी; सुर्याजीराव याचा दादाजी; व चंद्रराव याचा बाळाजी येणेप्रमाणें मोरे घराण्यांतील मंडळी स्वसंरक्षणार्थ विजापूरच्या बादशहाच्या आश्रयास जाऊन राहिली. वरील सहा जणांनीं विजापूरकरांच्या वतीनें समशेर गाजविल्यामुळें, बादशहानें खुष होऊन `धुळप’ असा बहुमानाचा किताब दिला, अशी माहिती मिळते. विजापूरकर व शिवाजी यांच्या झटापटींत या मोऱ्यांपैकीं-धुळपांपैकीं बरीच मंडळीं कामास येऊन, शेवटी छत्रपतींच्या धाकानें अवशिष्ट मंडळी वाट फुटेल तेथें जाऊन राहिली (हणमंतराव व चंद्रराव यांचे वंशज धवडे बंदरीं, बागराव यांचे दुदुशी दुदगांवीं, सूर्याजीराव यांचे वसईस व कमळराव यांचे बीरवाडीत गेले).

ह्या घराण्याचा यापुढील पाऊणशें वर्षांचा इतिहास उपलब्ध नाहीं. इ. स. १७५६ मध्यें तुळाजी आंग्रे यास कैद केल्यानंतर पेशव्यांनीं विजयदुर्ग येथें आपल्या प्रत्यक्ष अधिकाराखालीं आरमाराचें मुख्य ठिकाण करून त्यास सुभा आरमार अशी संज्ञा दिली. या आरमारावर मुख्य अधिकारी एक असून त्यास सुभेदार निसबत सुभा आरमार असें म्हणत. इ. स. १७६४ मध्यें हणमंतराव मोरे यांचे वंशज आनंदराव धुळप या दर्यायुद्धांत नाणवलेल्या गृहस्थाकडे मराठ्यांच्या आरमाराचें आधिपत्य आलें. इ. स. १७९४ पर्यंत म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे आनंदराव हाच सुभ्याचा प्रामुख्येंकरून कारभार आटपीत असे (आनंदरावाची हकीकत ज्ञानकोश विभाग ७ यांत त्याच्या नांवाखालीं पृ. १५३ वर पहा.). आनंदरावाप्रमाणेंच हरबाजीराव, जानोजीराव इत्यादि धुळप मंडळींनीं आरमाराची उत्कृष्ट कामगीरी करून पेशव्यांकडून वेळोवेळीं बक्षिसेंहि मिळविली. इ. स. १८१८ मध्यें पेशवाई नष्ट झाल्यानंतर त्याच्या वंशजांस इंग्रजांनीं `पोलिटिकल पेन्शन’ करून दिलें. श्री. कृष्णराव रघुनाथराव ऊर्फ बाबासाहेब या घराण्याचे विद्यामान वंशज हल्लीं विजयदुर्ग येथें राहतात.विजयदुर्ग येथील किल्ला, गोदी, वगैरे स्थलें प्रेक्षणीय आहेत. थोरले माधवराव पेशवे यांनीं स. १७७४ त जानोजी धुळप यास दक्षिणेंत स्वारीस पाठविलें होतें. इ. स. १७७५ मध्यें महीच्या पैलतीरी हरिपंत फडके व दादासाहेब यांचें युद्ध झाल्यावर पेशव्यानें जानराव धुळप यांस सांगितलें कीं दादासाहेब मुरतेकडून जाहाजांतून जलमार्गे एखादेंकडे जातील, याची बातमी व बंदोबस्त ठेवून, प्रसंगीं त्यांशीं गांठ घालून हस्तगत करून घेणें. ले. प्रूएन वगैरे इंग्रजांशीं झालेल्या दर्यायुद्धांत (१७८३ एप्रिल) धुळपांनीं फार पराक्रम केला. त्याबद्दल पेशव्यांनीं त्यांस बक्षीसें दिलीं. [भा.इ.मं. अहवा. १८३३; लो.- हिस्टरी ऑफ धि नेव्ही; स्टेट पेपर्स बाँबे.]

साभार : केतकर ज्ञानकोश.

टीप : वरील माहिती हि दुसऱ्या महायुद्धा आधी लिहिलेली आहे. त्यामुळे यात नवीन माहिती नाही आहेत.

Dahisar gavdevi - दहिसर गावदेवी

ही माहिती आमच्या दहिसरच्या गावदेवी मंदिराबाबत मिळते.

"फार वर्षांपूर्वी वसईचे शूर चिमाजी आप्पा यांना स्वप्नात देवीच्या शिलामुर्ती दिसल्या. त्या मुर्त्या होत्या श्री वर्धकनी देवी व दोन रक्षक श्री शिंदोबादेव आणि श्री कोल्हापूर देव. त्यांना ज्या ठिकाणी दिसल्या त्याच ठिकाणी मुर्त्या सापडल्या व त्यांनी त्याच ठिकाणी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. कालांतराने हि देवी संपूर्ण दह्हीसार परिसराची श्री गावदेवी म्हणून मानली गेली."

Sunday, May 11, 2014

The Bombay Governor's residence

The Bombay Governor's residence

This building was originally a Portuguese Franciscan friary, completed in 1673 and taken over by Governor Boone in 1719 as a country residence after which it became the official summer home of Governors of Bombay, and Parel developed as an affluent district.
In 1771, when William Hornby resided here as Governor, it became the new Government House in place of the original one in the Fort. The banqueting hall and ballroom are housed in the shell of the original vaulted chapel, and were much admired for their splendour.
Several mills now sprang up on the newly-reclaimed flats around Parel and the ensuing congestion and pollution resulted in the shifting of the Governor's residence to a new Government House at Malabar Point. After the plague epidemics in the 1890s, the house at Parel was converted into the Haffkine Research Institute.

Saturday, May 10, 2014

सफर जलदुर्ग पद्मगडची - सदानंद कबरे

सफर जलदुर्ग पद्मगडची - सदानंद कबरे

लांबरुंद समुद्रकिनारे आणि नितळ पाणी हे मालवणच्या समुद्रकिना-याचं वैशिष्टय आहे. नैसर्गिक देखणेपण लाभलेल्या या समुद्रकिना-यावर पद्मगड हा जलदुर्ग दिमाखात उभा आहे. परकीय शत्रूंपासून कोकणपट्टय़ाचं संरक्षण व्हावं याकरिता सतराव्या शतकात पद्मगडाची निर्मिती करण्यात आली. मालवणात सहलीला जाणारे पर्यटक सहसा या किल्ल्याची फेरी चुकवत नाहीत..
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सिंधुदुर्गाचं महत्त्वाचं भौगोलिक स्थान शिवरायांनी ओळखलं होतं. त्यांनी सतराव्या शतकात मालवणच्या सागरतीरावर तीन जलदुर्गाची निर्मिती केली. ते जलदुर्ग म्हणजे पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे होत. या तिन्ही जलदुर्गापैकी पद्मगड पाहण्यासाठी भटक्यांची गर्दी होते. पद्मगडाची भौगोलिक रचना खासच आहे. मालवणच्या समुद्रकिना-यावरून सिंधुदुर्गाकडे पाहिल्यास डावीकडे ‘पद्मगड’ तर उजव्या किना-याच्या भूशिरावर ‘राजकोट’ आहे. सर्जेकोट मालवण किना-यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. समुद्राला ओहोटी आल्यावर सर्जेकोटापासून पद्मगडाला चालत जाता येतं.

पद्मगडाकडे जाताना किना-यावर दांडगेश्वराचं मंदिर लागतं. या मंदिराच्या समोर सिंधुदुर्गाकडे समुद्रात शिरलेली वाळूची पुळण दिसते. मागे आलेल्या त्सुनामीचा धक्का या मालवण समुद्रकिना-याला बसला होता. त्या वेळी सिंधुदुर्गाकडच्या मधल्या भागातील सर्व पूळणच वाहून गेली होती. त्यामुळे या भागात मोठया प्रमाणात खोलगट भाग तयार झाला होता. तेव्हा ओहोटीच्या वेळीसुद्धा पुरुषभरापेक्षा जादा उंचीचं पाणी भरायचं. त्या वेळी एखाद्या होडीनेच पद्मगडाकडे जावं लागायचं. गेल्या काही वर्षात पाणी पुन्हा साठल्यामुळे ओहोटीच्या वेळी कमरेएवढया पाण्यातून जावं लागायचं.

मालवणच्या धक्क्यापासून पद्मगडापर्यंत येण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. रचिव दगडांनी पद्मगडाची तटबंदी उभारलेली आहे. याचा दरवाजा बरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाजासमोरच आहे. किल्ल्याच्या लहानशा दरवाजातून आत गेल्यावर वेताळ मंदिर आहे. मालवणच्या कोळी बांधवांचं श्रद्धास्थान असल्याने त्यांची येथे नित्यनेमाने ये-जा चालू असते. त्यामुळे वेताळाची नियमित पूजाअर्चाही होते. पद्मगडाचा उपयोग शिवकाळामध्ये गलबतांच्या दुरुस्तीसाठी केला जायचा. त्यासाठी भरती ओहोटीच्या वेळा साधून या खडकाळ बेटावरील धक्क्यावर गलबतं आणली जायची. या गोदीत दुरुस्त झालेली अथवा नव्याने बांधलेली मध्यम आकारची गलबतं भरतीच्या वेळी बाहेर काढून सागरात दाखल व्हायची.

माहिती साभार : Prahaar
लिंक : http://prahaar.in/feature/bhannat/131795

सदर छायाचित्र श्री संतोष पेडणेकर यांच्या ब्लॉग येथून घेण्यात आले आहे. तसेच या छायाचित्राचे सर्व हक्क त्यांच्याकडे राखीव आहेत.
आपण त्यांच्या ब्लॉगला खालील लिंकद्वारे भेट देऊ शकता.
http://santoshpednekar.wordpress.com/page/82/

Friday, May 9, 2014

भंडारी

नौकानयन व बरकंदाजी हे भंडारी लोकांचे पंरपरागत धंदे होत. समुद्रावरील सर्वांत मोठा अधिकारी 'महानायक' या पदवीचा असे. ‘महानायक’ या पदवी अगर अधिकारदर्शक नांवाचें 'मायनाक' हें अलीकडील रूप भंडा-याच्या आडनांवांत सांपडतें. कीर, पांजरी, नामनाईक-नांबनाईक (नौकानाईक), सारंग, तांडेल हीं भंडारी लोकांचीं आडनांवें देखील प्राचीन नौकानयनदृष्ट्या अशींच महत्त्वाचीं आहेत. होकायंत्राचा शोध लागला नव्हता अशा काळीं प्रत्येक तारवावर दूरवर उडून जाणा-या पक्ष्यांचा एक पिंजरा भरून ठेवलेला असे. समुद्रकिनारा सोडून तारवें दूरवर गेलीं, व दोन्हीं बाजूंचे तीर दिसेनासें झालें म्हणजे किनारा शोधून काढण्यासाठीं कीर नांवाचा तारवावरील अधिकारी या पिंज-यांतून दोन दोन तीन तीन पक्षी बाहेर सोडून देई. हे पक्षी आपल्या स्वाभाविक गुणांप्रमाणें किना-याकडे उडून जात. व किनारा बराच दूर असला म्हणजे संध्याकाळपर्यंत आकाशांत भ्रमण करून परत तारवावर येत. या त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गाचें नीट धोरण राखून कीर तारूं हाकरण्याची इशारत देत असे. पांजरी या अधिका-याचें काम, राजांच्या गलबतावरील डोलकाठीच्या पिंज-यांत उभे राहून शत्रूंच्या जहाजांची टेहळणी करण्याचें असे. सारंग नांवाच्या अधिका-याला वारा कसा व कोणत्या दिशेनें वाहतो, कोठें खडक आहेत, तुफान वगैरे होण्याच्या पूर्व चिन्हांचीं व आकाशांतील नक्षत्रांची पूर्ण माहिती असावी लागे. तांडेल हा इतर खलाशी लोकांवरील मुख्य असे. लढाऊ जहाजांवरील मुख्य नांवनाईक किंवा नामनाईक असे. रत्नागिरी जिल्ह्यांतील विजयदुर्ग येथील जावकर घराण्याच्या मूळ पुरूषास, त्यानें जावा बेटांत कित्येक सफरी केल्या व तेथें जमीनजुमलाहि संपादिला होता म्हणून 'जावकर' म्हणूं लागले असें सांगतात. तेराव्या शतकांतदेखील. पश्चिमकिना-यावर भंडारी लोक समुद्रावर चांचेगिरी करून परकीय व्यापा-यांनां मनस्वी त्रास देत होते. शिवाजी महाराजानीं आरमार ठेविल्यावर चांचेगिरी करण्याचें सोडून बरेच भंडारी व कोळी लोक महराजांच्या सेवेत राहिले. महाराजांचा पहिला समुद्रसेनापति होण्याचा मानहि 'मायनाक' आडनांवाच्या भंडा-यासच मिळाला होता (१६४५ ते १६९०). दर्यासारंग, उदाजी पडवळ व सांवळ्या तांडेल नांवाचे दुसरे समुद्रसेनापतीदेखील भंडारीच होते. आंग्र्याच्या सरदारांत मायाजी भाटकर, इंद्राजी भाटकर, बकाजी नाईक, हरजी भाटकर, सारंग जावकर, तोंडवळकर आणि पांजरी वगैरे भंडारी होते (१६९० ते १७६०). त्याचप्रमाणें धुळपांच्या अधिकाराखालीं दामाजी नाईक कुवेसकर, शिवाजीराव सुर्वे, विठोजी नाईक बांवकर, अनाजी नाईक बोरकर, रायाजी नाईक बोरकर, गणोजी नाईक भाटकर, विठोजी नाईक पनळेकर, गोविंदराम बाबूराव सांळुख्ये व दरजी नाईक पाटील (१७६० ते १७९०) वगैरे सरदार भंडारी ज्ञातीचे होते. करवीर दरबारच्या मालवणच्या सरदारांत दादाजी नाईक तोंडवळकर हे भंडारी सरदार प्रमुख होते (१७८१ ते १७८२).

संदर्भ : केतकर ज्ञानकोश


टीप : वरील माहिती हि दुसऱ्या महायुद्धा आधी लिहिलेली आहे. त्यामुळे यात नवीन माहिती नाही आहेत.

Thursday, May 8, 2014

'गोपाळगड' राज्य संरक्षित कधी?

यशवंतगडासारखा प्रकार गोपाळगडासोबत सुद्धा होणार आहे बहुतेक.

सरखेल संभाजी आंग्रे यांच्या अकाली निधनामुळे सरखेलपद कोणास द्यावे हा प्रश्न निर्माण झाला होता.
शाहूछत्रपतींनी जाहीर आव्हान केले की, जो कोणी जंजिऱ्याच्या सिद्दी कडून अंजनवेल आणि गोवळकोट जिंकून घेईल त्याला सरखेलपद दिले जाईल.

हा विडा तुळाजी आंग्रे यांनी उचलला. त्यांनी दोन्ही किल्ले जिंकले. हर्षित झालेल्या शाहूछत्रपतींनी या दोन्ही किल्ल्यांना नविन नावे दिली.

अंजनवेल -> गोपाळगड
गोवळकोट -> गोविंदगड 

Monday, May 5, 2014